उभे राहता राहता तोल गेला
चालता चालता रस्ता संपला
बघता बघता अंधार दाटला
दुःखाचे सांत्वन करता करता घसा कोरडा पडला …
असाच बराच वेळ विचार केला
आपण असं केलं असतं तर काय झालं असतं
आणि
तसं केलं असतं तर काय आलं असतं आपल्या वाट्याला
नव्या जाळ्यात अडकलेल्या बऱ्याच वाटा
एकही न पकडलेल्या …
मग मेंदूने ईशारा केला
खूप विचार करा
अजून प्रश्न उत्तरांचा भडीमार चालवा
पुन्हा हे गुंते नव्याने गुंतवा
आणि
असं करून कशाचीच उत्तरे न मिळाल्यावर पुन्हा रडा …
खूप रडून डोळ्यात पडला कोरडा
डोक्याचा पार झाला भुगा
काहीच न करू शकल्याच आला स्वतःलाच हेवा
शेवट मात्र गोड व्हावा अशी मनी इच्छा …
मग झाला विचार नव्या उमेदीने उभं राहायचा
ताज्या टवटवीत फुलासारखं उमलायचा
करकरीत तलवारीसारख लढायचा
आणि यात शेवट झाला गोड आणि विजय झाला झोपेचा ।।
No comments:
Post a Comment