Thursday, August 15, 2013

असशील हे खरं !

कळलंच नव्हतं तू काय आहेसं ?
झेपलचं  नव्हतं तू कोण आहेसं ?
पण तू होतास हे आणि आहेसं हे खरं .

जाणीव होती पण विश्वास नव्हता ,
मैत्री होती पण विचार  नव्हता ,
आधार होता पण हात  नव्हता ,
प्रेम होत पण गोडवा  नव्हता ,
साथ होती पण हट्ट नव्हता ,
एकांत होता पण एकटेपणा नव्हता .

आता कळलं तू काय आहेस?कोण आहेसं ?
पहिला पाऊस , नवी दिशा ,
नवी पालवी , नवा चेहेरा ,
नवे स्वप्न , नवे रंग ,
शांत आभाळ , खळखळणारा झरा ,
उडणारा पक्षी , मोकळा श्वास ……

पण तू होतास हे  आहेसं हे आणि  असशील हे खरं !



Saturday, August 10, 2013

उभे राहता राहता तोल गेला  
चालता चालता रस्ता संपला 
बघता बघता अंधार दाटला 
दुःखाचे सांत्वन करता करता घसा कोरडा पडला … 

असाच बराच वेळ विचार केला 
आपण असं केलं असतं तर काय झालं असतं 
आणि 
तसं केलं असतं तर काय आलं असतं आपल्या वाट्याला 
नव्या जाळ्यात अडकलेल्या बऱ्याच वाटा 
एकही न पकडलेल्या … 

मग मेंदूने ईशारा केला 
खूप विचार करा 
अजून प्रश्न उत्तरांचा भडीमार चालवा 
पुन्हा हे गुंते नव्याने गुंतवा 
आणि 
असं करून कशाचीच उत्तरे न मिळाल्यावर पुन्हा रडा …   

खूप रडून डोळ्यात पडला कोरडा 
डोक्याचा पार झाला भुगा 
काहीच न करू शकल्याच आला स्वतःलाच हेवा 
शेवट मात्र गोड व्हावा अशी मनी इच्छा …  

मग झाला विचार नव्या उमेदीने उभं राहायचा   
ताज्या टवटवीत फुलासारखं उमलायचा 
करकरीत तलवारीसारख लढायचा 
आणि यात शेवट झाला गोड आणि विजय झाला  झोपेचा ।। 

Sunday, June 30, 2013

माणूस नेहेमी प्रेमात किंवा भीती मध्ये जगतो .
आपण एखाद्या माणसावर प्रेम तर करतो पण पुन्हा दुसर्याच क्षणी त्याला गमवायची भीती मनात बाळगतो . तसेच आयुष्यात मोठ तर व्हायचं असत पण नंतर आपल्याला जमेल न सगळ याची भीती मनात धरून संसारच गाड पुढे धकलतो. 
या प्रेम आणि भीतीच्या नादात कित्येक गोष्टी डोक्यातून निसटून जातात. 
पण ते आपल्या हातून सांडून गेल्यानंतर लक्षात येत. 
मग कधी माणूस शांततेत , प्रेमात आणि आनंदात जगणार ? 
की फक्त सुंदर देखावे रंगवणार आणि मनाची समजूत घालणार. 
खरं तरं या सगळ्याचं  उत्तर एकच असाव "अपेक्षा ". 
अपेक्षा किती , कश्या ,कोणाकडून आणि ठेवायच्या कि नाही ?
या सगळ्याचं उत्तर मिळाल की कदाचित तू प्रेमाने बोलशील , खळखळून हसशील आणि आनंदात जगशील. 
जरा भीतीचं पांघरून बाजूला सारून प्रेमाच्या मऊ गोधडीत शिरून बघ …    


Wednesday, April 17, 2013

नाव,चौकट,बंधन …

नात्यांना नाव पडली की त्यांच्या चौकटी ठरतात,
चौकटी ठरल्या की त्यात राहायच्या  मर्यादा पडतात,
नको ती नाव, नको ती चौकट, नको ते बंधन …

का तो क्षण थांबला नाही ? , पुन्हा आलाच नाही ?
बघायचं होत तुला डोळे तृप्त होईपर्यंत,
भिडायचं होत तुला मन भरेपर्यंत.

ही नाती, त्यांना ठेवलेली नाव, ती चौकट,
झुगारून टाकल सगळं ,
आता कळून चुकलं नसतं काही यात वावगं.

पण तो क्षण ती भेट ,पुन्हा कशी रे येईल ?
कधी भेटशील का तू मला ?




Saturday, April 13, 2013

तू तोच आहेस, मी तू आहे :)


तुझ्यात मला शोधण्याची आस,
माझ्यात तुला बघण्याचा तो भास,
भासातून उमगलेला तू आणि भेटीसाठी आतुरलेली मी,
तू तोच आहेस,मी तीच आहे . 

बोलण्यातून स्पष्ट दिसणारा,वागण्यातून खोडकर असणारा,
कळलच नाही कधी गुंतावलस तू मला,
गुंतावण्यातून बहरले मी आणि बहरातून खुलवलस तू,
तू तोच आहेस,मी तीच आहे .

रंग चढले , प्रेम व्यक्त झाले,
तुझ्या आठवणीत मन झुलू लागले,
उंच भरारी घेतलीस तू आणि उडायला शिकले मी,
तू तोच आहेस,मी तीच आहे .

गप्पा, हसणं - खिदळणं , फिरणं आवडू लागलं आपल्याला, 
हातातले हात घट्ट पकडणं  मान्य होत एकमेकांना,
माझ्यासाठी असलेला तू आणि तुझ्यासाठी असलेली मी,
तू तोच आहेस, मी तू आहे :)




Wednesday, April 10, 2013


घट्ट मिठी ती समुद्राकाठची ,
ती ओली माती आपुल्या वाटची ,
त्या रिमझिमणाऱ्या पाऊस धारा, 
तो शहारणारा वारा ,
आठवून जाई क्षणात मजला ,
तो क्षण डोळ्यात माझ्या सजला ,
ती प्रीत होती का एका रातची ?
घट्ट मिठी ती समुद्राकाठची !!!