नात्यांना नाव पडली की त्यांच्या चौकटी ठरतात,
चौकटी ठरल्या की त्यात राहायच्या मर्यादा पडतात,
नको ती नाव, नको ती चौकट, नको ते बंधन …
का तो क्षण थांबला नाही ? , पुन्हा आलाच नाही ?
बघायचं होत तुला डोळे तृप्त होईपर्यंत,
भिडायचं होत तुला मन भरेपर्यंत.
ही नाती, त्यांना ठेवलेली नाव, ती चौकट,
झुगारून टाकल सगळं ,
आता कळून चुकलं नसतं काही यात वावगं.
पण तो क्षण ती भेट ,पुन्हा कशी रे येईल ?
कधी भेटशील का तू मला ?
का तो क्षण थांबला नाही ? , पुन्हा आलाच नाही ?
बघायचं होत तुला डोळे तृप्त होईपर्यंत,
भिडायचं होत तुला मन भरेपर्यंत.
ही नाती, त्यांना ठेवलेली नाव, ती चौकट,
झुगारून टाकल सगळं ,
आता कळून चुकलं नसतं काही यात वावगं.
पण तो क्षण ती भेट ,पुन्हा कशी रे येईल ?
कधी भेटशील का तू मला ?
No comments:
Post a Comment